नमो किसान योजना : पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; अहमदनगर जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला ? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही वर्तमान शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली होती. ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचे स्वरूप पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे तसेच निकष देखील पीएम किसान प्रमाणेच आहेत. जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र ठरले आहेत त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच या नवीन योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अर्थातच राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचे 6,000 आणि पीएम किसानचे 6,000 असे एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा आता श्री गणेशा देखील झाला आहे. योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. खरंतर या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता.

पण काल अखेर शेतकऱ्यांची ही आतुरता, प्रतीक्षा संपली आहे. काल अर्थातच 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. काल शिर्डी येथे आयोजित एका कार्यक्रमातून पीएम मोदी यांनी एक बटन दाबून राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हफ्ता वितरित केला आहे.

दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची काल जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे त्यात सर्वाधिक लाभ मराठवाडा आणि विदर्भाला मिळाला आहे. या योजनेचा कोकणातील जिल्ह्यांना सर्वाधिक कमी लाभ मिळाला आहे. मराठवाड्याबाबत विचार केला असता मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मिळाला असे.

जिल्हानिहाय विचार केला असता अहमदनगर जिल्ह्याला पहिल्या हफ्त्यापोटी सर्वाधिक निधी मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या पाच लाख 17 हजार 611 एवढी आहे. आता आपण पहिल्या हफ्त्यापोटी कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.

हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर १०३.५२ कोटी, अकोला ३७.५६ कोटी, अमरावती ५३.१८ कोटी, छत्रपती संभाजीनगर ६५.३७ कोटी, बीड ७७.९१ कोटी, भंडारा ३७.२१ कोटी, बुलडाणा ६६.३८ कोटी, चंद्रपूर ४३.३२ कोटी, धुळे २८.४९ कोटी, गडचिरोली २५.९३ कोटी, गोंदिया ४२.४८ कोटी, हिंगोली ३६.१२ कोटी, जळगाव ७५.९१ कोटी, जालना ५७.९५ कोटी, कोल्हापूर ८१.२५ कोटी, लातूर ५३.४६ कोटी, नागपूर ३०.०८ कोटी, नांदेड ७५.४८ कोटी, नंदुरबार २९.३२ कोटी, नाशिक ७७.०७ कोटी, धाराशिव ४२.२८ कोटी, पालघर १६.०७ कोटी, परभणी ५३.४२ कोटी, पुणे ७७.९७ कोटी, रायगड १९.६५ कोटी, रत्नागिरी २५.५२ कोटी, सांगली ७७.४४ कोटी, सातारा ७८.६७ कोटी, सिंधुदुर्ग २१.६२ कोटी, सोलापूर १०.८१ कोटी, ठाणे १३.६७ कोटी, वर्धा २४.६८ कोटी, वाशिम ३०.८१ कोटी, यवतमाळ ५५.४३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.