रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई, पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ विशेष एक्सप्रेस गाड्यांना मिळाली मुदत वाढ, कोणत्या तारखेपर्यंत सुरु राहणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास केला जातो. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि खिशाला परवडणारा असल्याने सर्वसामान्य या प्रवासाला अधिक पसंती दाखवतात.

मुंबई आणि पुणे या मेट्रो शहरात देखील रेल्वे प्रवाशांची संख्या ही खूपच अधिक आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई आणि पुण्यातून सुरू करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या विशेष एक्सप्रेस गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई ते रीवा आणि पुणे ते जबलपूर यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई ते रीवा दरम्यान सुरू करण्यात आलेली विशेष गाडी 29 सप्टेंबर पर्यंत चालवली जाणार होती. ही गाडी दर शुक्रवारी चालवली जात आहे. मात्र या गाडीला प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली असल्याने आता ही गाडी एक डिसेंबर 2023 पर्यंत चालवली जाणार आहे. याशिवाय रिवा ते मुंबई ही गाडी 28 सप्टेंबर 2023 पर्यंत चालवली जाणार होती. ही गाडी दर गुरुवारी चालवली जात आहे. ही गाडी आता 28 सप्टेंबर ऐवजी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालवली जाणार आहे.

याशिवाय जबलपूर ते पुणे दरम्यान 24 सप्टेंबर पर्यंत दर रविवारी विशेष गाडी चालवली जाणार होती. मात्र आता या गाडीला मुदत वाढ देण्यात आली असून ही गाडी आता 26 नोव्हेंबर पर्यंत चालवले जाणार अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय पुणे ते जबलपूर दरम्यान 24 सप्टेंबर पर्यंत विशेष गाडी चालवली जाणार होती. ही गाडी दर सोमवारी चालवली जात आहे. मात्र ही गाडी आता 25 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.